Articles

डोन्ट लूक अप

डोन्ट लूक अप

अमेरिकेत घडणारं कथानक दाखवलं असलं, तरी ते आपल्याही देशाला लागू पडतय  असं वाटावं अशी ही गोष्ट म्हणजे डोन्ट लूक अप हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला चित्रपट!अमेरिकेतल्या मिशिगन स्टेट युनिव्‍हर्सिटी मध्ये खगोलशास्त्रात पीएचडी करणारी विद्यार्थिनी केट डिबियास्की (जेनिफर लॉरेन्स) दूरवरचं निरीक्षण करू शकेल अशा दुर्बिणीने अंतरिक्षाचा अभ्यास करत असताना तिला एक धूमकेतू दिसतो. हा धूमकेतू बराच मोठा असतो. जवळजवळ 10 किमी व्‍यासाचा धूमकेतू वेगाने पृथ्वीकडे येताना तिला दिसतो. धूमकेतू हा उल्केसारखा असणारा एक खगोलशास्त्रीय पदार्थ असून ते सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतात. पुढे वाचा

विवाहसंस्था: काल, आज आणि उद्या

विवाहसंस्था: काल, आज आणि उद्या

एका लोककथेप्रमाणे ‘ती’ पिंजऱ्यात बंदिस्त! रोजच्या जगण्याला कंटाळलेली. मोकळा श्‍वास घेण्यासाठी आणि पंखांनी भरारी मारण्यासाठी उत्सुक, पण पिंजऱ्याभोवतीचं आवरण तिला ती गोष्ट कधीच करू देत नाही आणि हळूहळू तीही आपल्याला पंख आहेत हेच विसरून जायला लागते. एके दिवशी मात्र असह्य होऊन आता पाऊल उचललंच पाहिजे असा मनाशी निर्धार करते. पण त्या विचारातच रात्र होते, मध्यरात्र होते. ती विचारच करते आणि मग एकाएकी ती मनाचा हिय्या करून पिंजऱ्याचं दार उघडून बाहेर पडते. तिला नदीच्या पलीकडल्या तिरावर जायचं असतं. ती नदीकाठच्या नावेत बसते आणि नाव वल्हवायला सुरुवात करते. पुढे वाचा

रागाचं व्यवस्थापन - राग का येतो ?- थिंक पॉझिटिव्ह दिवाळी 2020

रागाचं व्यवस्थापन - राग का येतो ?- थिंक पॉझिटिव्ह दिवाळी 2020

‘मर्यादा’ या हिंदी चित्रपटात राजेश खन्ना आणि माला सिन्हा यांच्यावर एक गाणं चित्रीत केलं होतं. ‘ग, ग, ग, गुस्सा इतना हसीन है तो प्यार कैसा होगा’ हे गाणं त्या वेळी खूपच लोकप्रिय ठरलं होतं. चित्रपटात रागाकडे एका रोमँटिक मूडमध्ये येऊन बघणं ठीक आहे, पण प्रत्यक्षात मात्र या रागाचे परिणाम भयंकर होतात. रागाच्या भरात माणूस स्वत:चं संतुलन गमावून बसतो आणि स्वत:बरोबरच इतरांचंही भरून न येणारं नुकसान करतो. कधी रागाच्या भरात मारामारी, तर कधी खून; कधी नातेसंबंधात दुरावलेपण, तर कधी नवरा-बायकोमध्ये घटस्फोट. हा राग अनेक कारणांमुळे येत असला, तरी हा राग येतो कुठून? पुढे वाचा

बाईच्या जीवंतपणाला चूड लावणाऱ्या प्रथेची गोष्ट :  सती प्रथा आणि राजा राममोहन रॉय

बाईच्या जीवंतपणाला चूड लावणाऱ्या सती प्रथेची गोष्ट

सतीची प्रथा हे शब्द समोर आले की राजा राममोहन रॉय (२२ मे १७७२-२७ सप्टेंबर १८३३) यांचं नाव डोळ्यासमोर येतं. तसंच सतीविषयी बोलायचं झालं तर मराठी वाचकाला चटकन रणजीत देसाईंची ‘स्वामी’ ही कादंबरी देखील लगेचच आठवते. या ऐतिहासिक कादंबरीची पार्श्वभूमी खूपच वादळी आणि राजकीय परिस्थितीत होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. लोक स्वातंत्र्याचा श्वास घेत मुक्त, निर्भय जीवन जगू लागले. मात्र १६८० ला शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचा मुलगा संभाजी याला शिवाजी महाराजांप्रमाणे स्वराज्याची धुरा सांभाळता आली नाही. पुढे वाचा