रवींद्रनाथ टागोर

शब्दांचे जादूगार रवींद्रनाथ टागोर

एक छोटीशी मुलगी घराच्या खिडकीत बसून बाहेर चाललेली मिरवणूक बघत असते. त्या नगरीचा राजकुमार लवकरच तिच्या दारावरून पुढे जाणार असतो. एकाही कामात तिचं लक्ष लागत नसतं. छानसं तयार होऊन, गळ्यात माळ, कानात डूल घालून तिला खिडकीतून राजकुमाराला बघायचं असतं. खरं तर राजकुमाराला ती चिटुकली मुलगी दिसणार देखील नसते तरीही तिला मात्र सगळं दृश्य बघायचं असतं. इतकंच नाही तर तिच्या गळ्यातली माळही तिला राजकुमाराला द्यायची असते. जेव्हा राजकुमाराचा रथ तिच्या दारावरून जातो, तेव्हा खिडकीतून आनंदानं ती माळ खाली फेकते. क्षणार्धात तिची माळ रथाखाली चिरडली जाते. त्या माळेचं काय झालं कोणालाही कळत नाही. मुलगी मात्र खुश होते. पुढे वाचा

  प्रेमचंद

शब्दांचे जादूगार प्रेमचंद

हिरा आणि मोती नावाचे दोन बैल असतात. त्यांची आपसांत खूप मैत्री असते. ते शूर आणि स्वाभिमानी असतात. तसंच त्यांचं आपल्या झुरी नावाच्या मालकावर खूप प्रेम असतं आणि त्यांचा मालक देखील त्यांची खूप काळजी घेत असतो.  एके दिवशी झुरीचा मेव्हणा गोई झुरीकडे येतो आणि आपल्या शेतात काम करण्यासाठी त्याचे दोन्ही बैल त्यानं द्यावेत अशी मागणी करतो. बायकोचा भाऊ असल्यामुळे झुरीला नाही म्हणता येत नाही. हिरा आणि मोती यांना तो गोईबरोबर पाठवतो. हिरा आणि मोती यांना आपल्या राहत्या घरातून गोईबरोबर  पाठवणं आवडलेलं नसतं. आपल्या मालकानं आपल्याला विकलं असावं असंही त्यांना वाटतं. पुढे वाचा

आ. ह. साळुंखे

कविमनाचे आ.ह. साळुंखे!

महाराष्ट्रातले अभ्यासू पुरोगामी विचारवंत म्हणून आ. ह. साळुंखे ओळखले जातात. त्यांच्या कविता, त्यांची स्वकथनं, त्यांचं ललित लिखाण, त्यांचं बालसाहित्य, त्यांचं समीक्षात्मक लेखन आणि त्यांचं वैचारिक लेखन आज संपूर्ण महाराष्ट्राला नवा विचार देत आहे. त्यांच्या जगण्यावर चार्वाक, बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रभाव आहे. धर्म असो वा धर्मचिकित्सा, िायांचे प्रश्न असोत वा गुलामगिरीविषयीचं भाष्य, मनुस्मृतीबद्दलची आपली भूमिका असो वा चार्वाक, बुद्ध, फुले, शाहू महाराज यांच्या विचारांची केलेली मांडणी आ. पुढे वाचा

नवी व्‍यवस्‍था नवे प्रयोग

नवी व्‍यवस्‍था नवे प्रयोग

शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातला मोहंजोदडो आणि हडप्पाचा धडा हा कायम लक्षात राहणारा. कारण, पाचेक हजार वर्षांपूवीर् तिथे वसलेली शहरं, रस्ते, दुमजलं घरं हे अनुभवणं थरारक होतं. हा धडा शिकताना, एकदा तरी तिथे जावं असं वाटतंच. त्‍या संस्‍कृतीचे अवशेष्‍ आज फोटोतून बघायला मिळतात. त्‍या नगररचनेविषयी मला विलक्षण कुतूहल वाटतं आणि आजही मला त्‍यावेळच्‍या समाजजीवनात केलेला सार्वजनिक विचार खूपच भावतो. सांडपाण्याची व्‍यवस्‍था आणि सगळ्यात महत्‍वाचं म्‍हणजे नगररचना करत असताना सार्वजनिक स्‍वच्‍छता आणि आरोग्य यांचा किती विचार त्‍याकाळी केलेला दिसतो. पुढे वाचा