विंदांचं चेतनामधलं राष्ट्रीय स्मारक  आणि उदय प्रकाश

विंदांचं चेतनामधलं राष्ट्रीय स्मारक  आणि उदय प्रकाश

आनंद (करंदीकर) आणि सरिता (आवाड) यांचे मुंबईला जाण्याबद्दलचे फोन आले आणि २२ तारखेला सकाळी मुंबईला जायचं ठरलं. विंदा करंदीकर यांचं राष्ट्रीय स्मारक मुंबईच्या चेतना महाविद्यालयाच्या परिसरात उभारलं असून प्रत्येक वर्षी तिथं विंदाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. या वेळी राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक/कवी उदय प्रकाश यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. तसंच विंदांच्या आणि उदय प्रकाश यांच्या काही कवितांचं वाचन किशोर कदम आणि संदीप कुलकर्णी करणार होते. हा कार्यक्रम ऐकणं म्हणजे पर्वणीच असणार होती.  पुढे वाचा

मनामनातल्या विद्याताई 

मनामनातल्या विद्याताई 

विद्या बाळ! मिळून सार्‍याजणी या प्रथितयश मासिकाच्या संस्थापक-संपादक! नारी समता मंचाच्या संस्थापक, स्त्रियांनी व्यक्त व्हावं म्हणून 'बोलते व्हा' केंद्राच्या संस्थापक,  पुरुषांनाही बोलायचं आहे हे जाणवताच 'पुरुष संवाद केंद्र' सुरू करणार्‍या विद्याताई. सामाजिक कार्य करताना अन्यायाविरोधात कायम उभ्या राहणार्‍या विद्या ताई संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. खरं तर त्यांची ओळख इथं संपत नाही. त्या माझ्यासारख्या अनेकींच्या आणि अनेकांच्या मनामनात एक विद्या सोडून गेल्या आहेत. त्यांचं जगणं, त्यांचं वागणं, त्यांची कृती हे सगळं एक होतं. त्यामुळेच त्या प्रत्येकाला आपल्याशा वाटत होत्या.  पुढे वाचा

 ताणतणाव आणि मी

ताणतणाव आणि मी - टेंशन कायकू लेनेका - थिंक पॉझिटिव्ह दिवाळी 2019

स्वतःविषयीच बोलायचं झालं तर मी खूप सकारात्मक विचारांची व्यक्ती आहे. माझ्या मनात कितीही वाईट प्रसंग आला तरी आजपर्यंत कधी आत्महत्येचा विचार डोकावला नाही. याचं कारण जेव्हा मी शोधायला लागते, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. खरं तर आयुष्यात अनेकदा चढउताराचे, नैराश्याचे अनेक प्रसंग आले, मनावर उदासीचे ढगही काही काळ पसरले. पण त्यावर मात कशी करायची हे कळत-नकळत लहानपणापासून मनावर बिंबलं गेलं. कधी भेटलेल्या व्यक्तींमुळे, तर कधी परिस्थितीमुळे, कधी मिळालेल्या चांगल्या-वाईट अनुभवांमुळे, तर कधी वाचलेल्या पुस्तकांमुळे!  पुढे वाचा

माझे गुज निरंजन दिवाळी 2019

मला आठवतं, लहानपणी मी फारशी बोलायची नाही. माझ्या मनात जे काय चाललंय ते इतरांनी ओळखावं असं मला वाटायचं. तसं झालं नाही तर मला फार राग यायचा. त्या वेळी मी चार-पाच वर्षांची असेन. आई-वडील तिरुपतीला गेले होते आणि माझी रवानगी आजी-आजोबांकडे परभणीला केली होती. मला खेळायला एक फुलाफुलांची पत्र्याची पेटी होती. त्यात माझी बाहुली आणि अनेक वस्तू होत्या. ही पेटी नेहमीच माझ्या सोबत असायची. हाताच्या मुठीत एक संगमरवरी शुभ्र ग्रीक शिल्पं असावीत अशी जोडी होती. ती गुळगुळीत शिल्पं मला खूपच आवडायची. माझी मूठ त्यामुळे घट्ट झाकलेली असायची. ते शिल्प हरवू नये यासाठी मी त्यांना जिवापाड जपायची. पुढे वाचा